काही वेळा समस्या सहृदय भावनेनं, तदनुभूतीनं ऐकणं हाच त्या न सुटणाऱ्या समस्येवरचा उपाय असतो!
प्रश्न आयुष्याकडे आम्ही लावलेल्या दृष्टिकोनाचा असतो. ताण परिस्थितीमुळे नाही, आमच्या मन:स्थितीमुळे निर्माण होतो, हे अशा वेळी प्रत्ययाला येतं. मला असंही लक्षात आलं की, काही वेळा समस्या सहृदय भावनेनं, तदनुभूतीनं ऐकणं हाच न सुटणाऱ्या समस्येवरचा उपाय असतो. समस्याग्रस्त माणसाला आपलं मन मोकळं करायचं असतं. कदाचित आपल्या समस्येवर झटपट उपाय नाही, हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं.......